ई-वाहनांबाबत कंपन्यांसह नागरिकांना प्रोत्साहित करणार; आदित्य ठाकरे

‘प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने ई-व्हेईकल पॉलिसी आणली आहे. त्यामुळे ई-वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भेट देत आहे.
Aaditya Thackeray
Aaditya ThackerayGoogle

पिंपरी - ‘प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने ई-व्हेईकल पॉलिसी आणली आहे. त्यामुळे ई-वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भेट देत आहे. त्यांच्यासह ई-वाहनांच्या वापराबाबत नागरिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे,’ असे आवाहन राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (ता. २९) केले.

शहरातील कायनेटिक ग्रीन एनर्जी अॅण्ड पॉवर सोल्यूशन आणि टाटा मोटर्स कंपनीला भेट देऊन ठाकरे यांनी ई-बाईक, व्हेईकल व सायकल आदी वाहनांबाबत माहिती घेतली. त्या दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘पर्यावरण संवर्धनासाठी लोकांनी जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहने घ्यावीत. त्यासाठी राज्य सरकारने इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी आणली आहे. अशी वाहने उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्याबाबत त्यांच्यासोबत चर्चा करत आहे. कंपन्यांमध्ये कशा पद्धतीने उत्पादन केले जाते. उत्पादन क्षमता किती आहे, याची माहिती घेत आहे. इलेक्ट्रिक वाहने बाजारात आल्यानंतर किती लोकांना ही वाहने वापरण्यासाठी प्रोत्साहित करू शकू, किती लोक इलेक्ट्रिक वाहने घेऊ शकतील. याची चाचपणी केली जात आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com