
काळेवाडी : औंध - किवळे बीआरटीएस मुख्य मार्गावरील रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने व्यावसायिक, सर्वसामान्य नोकरदार वर्गाला वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. सकाळ - सायंकाळी औंध दिशेला पुण्याकडे व पुण्यातून हिंजवडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. वाहतूक पोलिस असूनही कोंडी सुटत नसल्याने ती सुरळीत वाहतुकीची ‘भक्षक’ झाल्याचे दिसून येत आहे.