

Gas Shortage Forces Workers to Leave Cities
Sakal
अविनाश ढगे
पिंपरी : ‘‘स्वयंपाकासाठी गॅस मिळत नाही, हॉटेल बंद आहेत, जे सुरू आहेत तेथे थाळीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे जेवणाची भ्रांत आहे. १५ रुपयांचा वडापाव २५-३० रुपयांना मिळतो आहे. काही दिवस वडापाव खाऊन काढले; पण आता गावाकडे जात आहे,’’ ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, कामगार सूरज गुप्ता यांनी. त्यांचे मनोगत प्राधिनिधिक असले तरी, सध्या अनेक मजुरांनी गावाकडची वाट धरली आहे. त्यामुळे गॅसटंचाई आणि कच्चा माल आयातीतील अडथळ्यांमुळे अडचणीत सापडलेल्या उद्योजकांपुढे मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ‘एमआयडीसी’ भागातील सुमारे ३० टक्के कामगार काम सोडून निघून गेले आहेत.