
पिंपरी - नवीन आर्थिक वर्षात अर्थात एक एप्रिलपासून रेडिरेकनरनुसार जागेच्या किमती वाढू शकतात. मुद्रांक शुल्कात वाढ होऊ शकते. बांधकाम साहित्याच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे घरांच्या किमतीही वाढू शकतात. परिणामी, ३१ मार्चपर्यंत अर्थात पुढील दोन महिन्यांत घर घेण्याची चांगली संधी नागरिकांपुढे आहे. बॅंकांचे धोरणही गृहकर्जासाठी सकारात्मक असून, काही बॅंका तब्बल ९५ टक्क्यांपर्यंत कर्जपुरवठा करत आहेत. त्यामुळे पुढील दोन महिन्यांचा कालावधी स्वतःचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.