maval water
sakal
तळेगाव दाभाडे - मावळ तालुक्यात यंदा जानेवारी ते मार्चदरम्यान तब्बल १३ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूची मालिका सुरू असून, गेल्या दोन वर्षांत २६ व्यक्तींनी अशा दुर्घटनांमध्ये जीव गमावला आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.