PCMC
sakal
पिंपरी - लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर महापालिकेचा कारभार आला आहे. मात्र, सभाशास्त्र सर्वांना अवगत नसल्याचे चित्र आहे. कारण पीठासीन अधिकाऱ्यांनी परवानगी न देताच बोलायला सुरुवात करणे, एका वेळेस दोघा-तिघांनी बोलायला उभे राहणे, पीठासीन अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करून सभागृहाबाहेर जाणे किंवा येणे, एकमेकांची खिल्ली उडवणे, महिला प्रतिनिधी विचार मांडत असताना आपापसांत बोलणे, पीठासीन अधिकाऱ्यांचे न ऐकणे, उलट उत्तर देणे, महिलांविषयी अपशब्द वापरणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे बहुतांश कारभाऱ्यांना सभाशास्त्राचे धडे देण्याची अर्थात प्रशिक्षणाची गरज आहे.