घरात बसले आणि पाण्यात खेळले पिंपरी-चिंचवडकर

Pavana-Dam
Pavana-Dam

बेबडओहोळ - लाॅक डाऊनच्या काळात २२ लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला तीन महीने जास्त पाणीपुरवठा करण्यात आला. या कालावधीत औद्योगिक परीसरापेक्षा घरगुती पाण्याचा वापर जास्त केला गेला. असे असताना देखील, यंदा पवना धरणात ३१.२६ टक्के पाणी साठा ऊपलब्ध असुन गेल्या वर्षीच्या तुलनेत हा १६ टक्के जास्त आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पवनेवर १९७१ मध्ये पवना धरण बांधण्यात आले. पवनेचे उगमस्थान मावळ तालुक्याच्या पश्मिेकडील व रायगड-पुणे जिल्हय़ाच्या हद्दीजवळ आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या काले कॉलनी, ब्राम्हणोली, कोथुर्णे, येळसे, शिवली, कडधे, आर्डव, करंज, थुगाव, बऊर, सडवली, ओझर्डे, शिवणो, उर्से या गावांच्या हद्दीतून पवनेचा प्रवाह सुरू होतो. नैसर्गिक उतार असल्याने उन्हाळय़ातही पाणी वाहत असते. नदी काठची गावे पुढे मजल दरमजल करीत पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड रावेत हद्दीत सुमारे ४० किलो मीटर प्रवास करते. पुढे पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदीची लांबी अंदाजे २५ किलोमीटर. शहरातील किवळे, रावेत, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी या भागातून पवना नदी वाहत जाते असा हा पवना धरण ते पवना नदीचा प्रवास आहे.

तालुक्याच्या नाहीतर तर जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेले पवना धरण आज मावळसह पिंपरी चिंचवड करांची तहान भागवते. २२ लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणाच्या पाण्याची क्षमता वाढलेली नाही.मार्च,एप्रिल व मे महीन्यात लाॅक डाऊन असताना दररोज ९०० ते ९२५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा पवना धरणातुन पिंपरी चिंचवड नगरपालिका, तळेगाव नगरपालिका, देहु कंटेनमेंट बोर्ड, रावेत यांना करण्यात आला. लाॅकडाऊनच्या काळात पाण्याची कमतरता लोकांना कमी पडु नये यासाठी दररोज हा पाणीपुरवठा केला जात होता. सध्या हा पाणीपुरवठा जुन महीन्यात कमी करून दररोज ८०० दशलक्ष लीटर ऐवढा केला जात आहे. 

लाॅकडाऊनच्या काळात पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात पाण्याचा वापर कमी झाला. सर्व कंपन्या बंद असल्याने पाणी वापर झाला नाही पण घरगुती पाण्याचा वापर जास्त झाला.

सध्या दोन महीने पुरेल एवढा ३१.२६ टक्के पाणीसाठा धरणात ऊपलब्ध असुन मागील वर्षापेक्षा १६ टक्के जास्त आहे. 

शाखा अधिकारी पवनाधरण, ए एम गदवाल
लाॅक डाऊनच्या काळात औद्योगिक परीसरापेक्षा घरगुती पाण्याचा वापर जास्त केला गेला.मागील वर्षी ८०० मिलीमीटर पाऊस जास्त झाल्याने पाणीसाठा भरपुर होता. त्यामुळे पाण्याचा वापर जास्त होवुनही यंदा धरणात पाणीसाठा १६ टक्के जास्त आहे. 

मार्च,एप्रिल व मे महीन्यात 
९२५ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा 
जुन महीन्यात
८०० दशलक्ष घनमीटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com