
पिंपरी : प्रत्येकाला जगण्यासाठी प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची गरज असते, आणि तो देण्याचे काम झाडे म्हणजेच वृक्ष करत असतात, हे सर्वमान्य आहे. मात्र, शहरीकरणामुळे अनेक ठिकाणी झाडे तोडली जातात आणि प्रदूषणवाढीला वाव मिळतो. त्याचा कळत-नकळतपणे सर्वांवर परिणाम होतो. त्यापासून वाचण्यासाठी झाडे लावणे आवश्यक आहे. म्हणूनच ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘यशदा रिॲलटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येणार आहे.