Stray Dogs Attack
sakal
पिंपरी - निगडी प्राधिकरणातील भटक्या श्वानांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या १५ दिवसांत भटक्या श्वानांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या दहा घटना घडल्या आहेत. रात्री उशिरा घरी येणाऱ्या नागरिकांना श्वान लक्ष्य करत आहेत. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याने आता निगडी प्राधिकरणातील नागरिकांनी ‘मुख्यमंत्री महोदय, आम्हांला वाचवा’ अशी विनंतीवजा मागणी केली आहे.