ssc exam student pratham education foundation
sakal
पिंपरी - काहींच्या आई-वडिलांनी त्यांना घरी बसवलेले होते, तर काहींच्या बाबतीत पालकांचे छत्र हरपून भावंडांची जबाबदारी अंगावर आली. त्यामुळे काम करण्यासाठी त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. इच्छा असूनही अनेकींना शाळामधूनच सोडावी लागली. मात्र त्यापैकीच १९४ महिलांनी आता लग्न, मुले, नातवंडे झाल्यानंतर दहावी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.