उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकार आणणार आता 'ही' नवीन योजना...

उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकार आणणार आता 'ही' नवीन योजना...
Updated on

पिंपरी : लॉकडाउनमुळे पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यातील अनेक भागांतील परप्रांतीय कामगारांनी उपासमारीमुळे घरचा रस्ता धरला आहे. त्यात आता राज्य सरकारने उद्योग सुरू करण्याची परवानगी दिल्यामुळे बहुतांश ठिकाणी कामगारांची कमतरता भासणार आहे. कोरोनाचे संकट कधी संपेल, हे सध्या तरी कुणालाच माहीत नाही. त्यामुळे उद्योगांना लागणाऱ्या मनुष्यबळाची कमतरता भागविण्यासाठी सरकार हे 'कामगार ब्युरो योजना' सुरू करण्याच्या विचारात आहे. 

राज्य सरकारचा उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास विभाग या तिघांच्या माध्यमातून ही योजना आकारात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यातील विविध शहरांमध्ये असणाऱ्या बेरोजगार तरुणांची त्यामध्ये नोंद करायची. उद्योगांची गरज पाहून त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळविण्यासाठी सक्षम करायचे, अशा प्रकारचे काम या माध्यमातून करण्यात येणार आहे. कामगार ब्युरोची योजना राबवत असताना संबधित शहर किंवा जिल्हा या परिसरातील तरुणांना त्याच ठिकाणी प्रशिक्षित करून त्या भागातील कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळू शकते. त्यामुळे नोकरीसाठी एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या स्थलांतरीचा प्रश्‍न कमी होण्यास मदत होणार आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बेरोजगारांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजक उत्सुक... 
मोठ्या प्रमाणात कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे उद्योजक मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागातील बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन कामासाठी सक्षम करता येऊ शकते का, याची चाचपणी आता उद्योजकांनी सुरू केली आहे. कोरोना कधी संपणार, त्यानंतर परराज्यात निघून गेलेले कर्मचारी परत येतील की नाही, याची शाश्‍वती नाही. त्यामुळे भविष्यात उद्योग चालविताना अडचण येऊ नये, म्हणून आपल्याच राज्यातील बेरोजगार युवकांना प्रशिक्षित करता येईल का, यासाठी उद्योजकांनी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

उद्योगांना आवश्‍यक असणारी कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून कामगार ब्युरोची योजना राबवण्याबाबत विचार सुरू आहे. उद्योग विभाग, कौशल्य विकास विभाग आणि कामगार विभाग या तीन यंत्रणांच्या माध्यमातून ही योजना सुरू होऊ शकते. या योजनेमुळे उद्योगांना आवश्‍यक असणारी मनुष्यबळाची गरज पूर्ण होण्यास मदत होणार आहे. 
- सदाशिव सुरवसे, सहसंचालक, उद्योग विभाग 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com