

पिंपरी : वर्षानुवर्षे कंपनीत नोकरी केल्यानंतर वयोमानानुसार निवृत्तीची वेळ येते. सेवानिवृत्तीवेळी कंपनीकडून मिळणाऱ्या हक्काच्या रकमेतून भविष्यातील वाटचालीचे नियोजन केलेले असते. मात्र, हीच रक्कम अचानक बँक खात्यातून गायब झाल्यास सेवानिवृत्त व्यक्तीचे धाबे दणाणतात. असाच प्रकार थेरगाव येथे घडला.