‘...अन्यथा महावितरण 
कार्यालयाला टाळे ठोकू’

‘...अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू’

पवनानगर, ता. १० : शेतकऱ्यांच्या कृषी पंपावर आव्वाच्या सव्वा वीज बिल आकारले आहे. ते जादा वीज बिल कमी दुरुस्त करून द्या, अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
पवनानगर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयात कोथुर्णे, मळवंडी ठुले, वारू या गावासह या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मोटर पंप वीज बिल वाढीच्या विरोधात महावितरणचे उपअभियंता यांना निवेदन दिलेले.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, शेतकरी शेतीसाठी गरजेपुरता विजेचा वापर करत असून त्या वापरानुसार विज बिल आकारावे. वीज पंपांना आलेले वाढीव बोगस वीज बिल शेतकऱ्यांना पंप एचपीनुसार अथवा मीटर रीडिंग प्रमाणे मिळणे आवश्यक आहे. परंतु, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अंदाजे रीडिंग घेऊन अव्वाच्यासव्वा वीजबिल आकारली आहेत, तर काही शेतकऱ्यांची वीजबिल भरणा न केल्याने कनेक्शन तोडली आहेत. ही वाढीव वीज बिल माफ करून कनेक्शन तोडलेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत त्वरित कनेक्शन जोडून द्यावे.
या मागण्या ३० जानेवारीपर्यंत मान्य नाही झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळा लावून ‘टाळाठोक’ आंदोलन करू, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, ज्ञानेश्वर मोहोळ, तुकाराम निबंळे, मधुकर काळे, हिरामण नढे, लक्ष्मण निबंळे, विष्णू खैरे, ज्ञानेश्वर निबंळे, शिवाजी ढोले, भानुदास सुतार यांनी निवेदन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com