जाधववाडी जलाशयात मृत माशांचा खच
इंदोरी, ता. २४ ः इंदोरीपासून सुमारे सात किलोमीटरवर असलेल्या जाधववाडी धरणाच्या जलाशयातील मासे मोठ्या प्रमाणात
मृत्यूमुखी पडत आहेत. परिसरातील ‘एमआयडीसी’तील कारखान्यांचे रसायनमिश्रित दूषित पाणी या जलाशयात सोडलेले असल्याने मासे मरत असावेत, असा अंदाज वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विकी दौंडकर यांनी वर्तवला आहे.
जाधववाडी प्रकल्प जलसिंचन विभागाचे अखत्यारित आहे. त्यांच्याकडून या प्रकल्पासाठी एकही रक्षक नसल्याने पर्यटकांकडून होणाऱ्या बेशिस्त वर्तनांवर नियंत्रण राहात नाही. परिणामी अनेकदा भांडणे, मारामाऱ्या होत
असतात. या जलाशयातून सुदुंबरे एनडीआरएफ पाणीपुरवठा होत असल्याने पंपिंग हाऊसजवळ एनडीआरएफचा कर्मचारी २४
तास याठिकाणी असतो. जलाशयातील पाणीसाठा बराच कमी झाल्याने दूषितपणाची तीव्रता वाढल्याने मासे मरत असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.