
तब्बल २१ तासांनंतर आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश
पिंपरी, ता. ८ : चिखली प्राधिकरण पेठ क्र. १६ राजे शिवाजीनगरमध्ये नागरिक महावितणच्या कारभाराला वैतागून गेले आहेत. पहाटे दररोज पहाटे पाचपासून वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी, नागरिकांना गैरसोयीचा सामना करवा लागत आहे.
वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने झोपेत असलेल्या नागरिकांना फॅन, कुलर बंद पडल्यामुळे मनस्ताप झाला आहे. पाणी उपसा मोटारी बंद पडल्यामुळे सोसायटीच्या वरच्या टाक्या रिकाम्या राहिल्या. मोशी येथील महावितरणच्या उपकेंद्रात आणि अन्य ग्राहक सेवा नंबरवर प्रयत्न करूनही संपर्क होत नव्हता. वायफाय, इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे ऑनलाइन काम करणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर माहितीचा संदेश पण मोबाईलवर येत नाही. या परिसरात सतत बिघाड होऊन वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. येथील देखभाल, दुरुस्ती व्यवस्थापन आणि ग्राहक सेवा कुचकामी आहे. व्यावसायिक आणि ग्राहक स्नेही वितरण आणि तक्रार निवारण अधिकारी मोशी महावितरण कार्यालयात नेमले तर वीज का गेली? याची उत्तरे तरी मिळतील. त्यामुळे सावळा गोंधळ थांबेल, असे येथील रहिवासी शैलजा कडुलकर यांनी म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..