देहूगाव तलाव परिसरात २०० रोपांची लागवड
देहू, ता. २२ : येथील देहू इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत व वृक्षदाई संस्था देहूगाव यांच्या सहकार्याने गायरान जमिनीवर मोठ्या तलावाशेजारी २०० रोपांची लागवड करण्यात आली. दरम्यान, ‘‘आपण सर्वांनी भविष्यातही वृक्षारोपण करावे,’’ असे आवाहन कंपनीचे कासिराज गणपतेय यांनी केले. ‘स्टडी इन द जनरल नेचर’ संस्थेच्या सर्वेक्षणानुसार पृथ्वीवरील वातावरणाचा समतोल राखायचा असेल, तर प्रतव्यक्ती ४२३ वृक्ष असणे गरजेचे आहे. सध्या आपल्या देशामध्ये हे प्रमाण फक्त २८ आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची गरज आहे, असे मत ‘वृक्षदायी’चे अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन सुभाष पाटील यांनी केले. विलास बोराडे यांनी आभार मानले. यावेळी सर्व कर्मचारी व वृक्षदाई संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.