शाहूनगरात बंद पथदिव्यांमुळे महिला कामगारांमध्ये भीती
जाधववाडी, ता.१७ ः शाहूनगर येथील केएसबी चौक ते कुदळवाडी चौकापर्यंतच्या रस्त्यावरील पथदिवे रात्री बंद असल्याने पादचाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. तेथून महिलांना चालताना भीती वाटत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने रात्री अंधारात रस्त्यावरून चालणे धोकादायक झाले असल्याचे नागरिक सांगत आहेत. या रस्त्यावर अनेकवेळा भटके श्वान फिरत असतात. हा रहदारीचा रस्ता असल्याने अनेक वाहनांची गर्दी असते तसेच पादचाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. हा रस्ता एमआयडीसीमधून जात असल्याने पायी चालणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. महिला कामगारांची सुद्धा जास्त संख्या आहे. त्यामुळे रस्त्यावरील पथदिवे पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
महिला कामगार दीपिका यादव म्हणाल्या,‘‘आम्ही कामावरुन रात्री सुटल्यावर या रस्त्यावरूनच जातो. मात्र, पथदिवे बंद असल्याने वाहनचालकाला पादचारी दिसला नाही; तर अपघात होऊ शकतो. येथे भटके श्वानही फिरत असतात. त्यामुळे भीती वाटते.’’
JDW25A00213
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.