अनाथांच्या आधारासाठी दानशूर हातांची गरज
लोणावळा, ता. ७ : ‘‘अनाथ, निराधारांच्या आधारासाठी व त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजातील दानशूर हातांची गरज असून यासाठी व्यक्ती व संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे,’’ असे आवाहन संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांनी केले.
सामाजिक बांधिलकी जोपासत विविध क्षेत्रात कार्य करत असलेल्या भाजे येथील संपर्क संस्थेला ३५ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर संपर्क बालग्राम संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बॅनर्जी बोलत होते. कार्यक्रमाला भाजेच्या सरपंच प्रिया ओव्हाळ, सदस्य विकास वाल्हेकर, सारिका पदमुले, एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे, उद्योजक शशिकांत कातळे, राष्ट्रवादीच्या जिल्हा युवती उपाध्यक्षा निशा पवार, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, राम ढगे उपस्थित होते.
‘‘देशभरात पसरलेल्या बालग्राम केंद्रात ६५० अनाथ निराधार मुलांचे संगोपन व शिक्षण होत आहे. निराधार मुलांच्या बाल कल्याणासाठी संस्था झटत असून, हजारो मुले आजपर्यंत आपल्या पायावर उभी राहिली आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले.
भाजे बालग्रामच्या दहावी व बारावी विद्यार्थिनीचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक अमितकुमार बॅनर्जी यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप वाडेकर यांनी केले. लताताई पांडे यांनी आभार मानले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.