रावेतमध्ये आठवडी बाजारांमुळे दुर्गंधी, वाहतूक कोंडी

रावेतमध्ये आठवडी बाजारांमुळे दुर्गंधी, वाहतूक कोंडी

Published on

रावेत, ता. ११ ः येथील परिसरातील विविध भागांमध्ये सध्या आठवडी बाजार आणि भाजीपाला विक्रीचे बाजार भरवले जातात. मात्र, यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच शिल्लक भाजीपाल्याचा कचरा, सडलेले फळे-भाज्या यामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरते आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या बाजारांमध्ये वाहनांची गर्दी, बेशिस्त पार्किंग तसेच ठिकठिकाणी टाकण्यात आलेले प्लॅस्टिक व कचरा यामुळे परिसराचे नागरी सौंदर्य आणि आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः शाळा, सोसायटी परिसरात भरवल्या जाणाऱ्या बाजारांमुळे विद्यार्थ्यांना आणि महिला नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या ‘ब’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त किरण मोरे यांनी सांगितले की, ‘‘आम्ही बाजार व्यवस्थापनाचे पुनर्विचार करत आहोत. भाजीपाला विक्रेत्यांनी आणि आठवडी बाजार मंडळाच्यावतीने तशी मागणी आल्यास यावर विचार केला जाईल.’’
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com