बिनविरोध निवडणुका लोकशाहीसाठी घातक

बिनविरोध निवडणुका लोकशाहीसाठी घातक

Published on

निगडी, ता. ८ : ‘‘निवडणुका म्हणजे लोकशाहीचा आत्माच असतात. निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना आपला प्रश्न विचारण्याची सामान्य नागरिकांच्या हक्काची जागा आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुका हे लोकशाहीसाठी घातक आहेत,’’ असे मत शिवसेनेचे नेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.

शिवसेना- मनसे- रासप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आकुर्डीत आयोजित सभेत बानुगडे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटीतील पायाभूत सुविधांचे अजूनही प्रश्न सुटलेले नाहीत. भाजप व महायुतीने आपल्या नातेवाइकांच्या निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. म्हणजे कुटुंबातील लोकांची सोयीसाठी पक्ष आहे का? हे असेच राहिले तर ‘वन नेशन, नो इलेक्शन’पर्यंत वाटचाल होऊ शकते. चांगल्या लोकशाहीसाठी हे घातक ठरेल. सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र घेऊनच येथे वाटचाल करावी लागेल. केंद्र व राज्यातील सत्तेतील एकत्र असलेले लोक परस्पर विरोधात लढून जनतेची दिशाभूलच करीत आहेत. भ्रष्ट कारभारावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यासाठी जनतेने जागे होऊन मतदान करण्याची गरज आहे.’’
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com