उत्कर्ष साधण्यासाठी मनाचे आणि विचारांचे सामर्थ्य महत्त्वाचे

उत्कर्ष साधण्यासाठी मनाचे आणि विचारांचे सामर्थ्य महत्त्वाचे

Published on

पिंपरी, ता. १० ः विद्यार्थ्यांच्या जीवनात उज्वल यश मिळण्यासाठी व सर्वांगीण विकास व उत्कर्ष साधण्यासाठी मनाच्या आणि विचारांच्या सामर्थ्याचा उपयोग होतो. असे प्रतिपादन सद्‌गुरु वामनराव पै. यांच्या सतशिष्या अस्मिता दाभाडे यांनी केले. जीवनविद्या ज्ञानसाधना केंद्र पिंपरी यांच्यावतीने ग. दि. माडगूळकर नाट्यगृह प्राधिकरण येथे आयोजित उत्कर्ष विद्यार्थ्यांचा संकल्प जीवनविद्येचा या विशेष मार्गदर्शन पर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, अभ्यासाच्या विविध पद्धती, आई-वडील, शिक्षकांचे महत्त्व, पर्यावरण व यशस्वी जीवनासाठी विविध गोष्टी नावीन्यपूर्ण रित्या समजावून सांगितल्या. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक व शिक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. जीवनविद्या मिशनच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाच्यावेळी नगरसेवक अमित गावडे, अमर गावडे, अध्यक्ष संजय भगत, सचिव कृष्णा मोरे व आदी सभासद उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.