कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Published on

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १०, : आंबी पुलाच्या वळणावर रस्त्याच्या कडेला रात्री टेंपोतून मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जातो. कचऱ्यामध्ये मृत प्राणी असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. येथील कचरा काढावा, अशी मागणी नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे. आंबी पुलाच्या दोन्ही बाजूकडील सीमाभिंतीचे काम सुरू झाले आहे. तसेच रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याचे कॅाक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हा जवळचा रस्ता असल्याने आंदर मावळ, एमआयडीसी तसेच फ्लोरीकल्चर पार्क आदी भागातील शेतकरी, गवळी, विद्यार्थी या रस्त्याने ये-जा करतात. पावसाने कचरा व मृत प्राणी कुजल्याने लांबवर दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथून जाताना पादचाऱ्यांना नाकाला रुमाल लावून जावे लागते.

tas-10-7-23-P1-
आंबी ः पुलाच्या वळणावरील रस्त्याच्या कडेला क‌चऱ्याचा ढिगारा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.