नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेसाठी कविता पाठवा

नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेसाठी कविता पाठवा

Published on

नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाने विनाशुल्क श्रावणी काव्यस्पर्धा आयोजित केली आहे. विषयाचे बंधन नाही, किमान बारा व कमाल वीस ओळींपर्यंत कविता असावी. ‘श्रावणी काव्यस्पर्धेसाठी’ असा उल्लेख करून कवितेचे शीर्षक, कविता, कवीचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहावा. राजकीय, सामाजिक, धार्मिक अथवा जातीय तेढ निर्माण करणारी कविता नसावी. लेखन व सादरीकरणाचे गुण एकत्रित करून विजेत्यांची निवड करण्यात येईल. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ प्रदान करून विजेत्यांना सन्मानित केले जाईल. १० ऑगस्टपर्यंत फक्त व्हॉट्सॲपवर टाइप केलेल्या कविता ७५८८३२८४६९ किंवा ८८८८४३४३३१ या क्रमांकावर पाठवाव्यात.

राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा
नक्षत्राचं देणं काव्यमंचातर्फे राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. ‘श्रावण’ व ‘निसर्ग’ या विषयावर कवींनी दोन कविता पाठवाव्यात. ही स्पर्धा नि:शुल्क आहे. निवडलेल्या कविता व विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित केले जाईल. प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल. स्पर्धेच्या दिवशी श्रावणी काव्य मैफल होईल. कवींनी ३० ऑगस्टपर्यंत आपला पत्ता, मोबाईल क्रमांक व पिनकोडसह प्रा. राजेंद्र सोनवणे, साई सदन, ए/3 महालक्ष्मी हाईट्स, भोसरी, पुणे-३९ या क्रमांकावर पाठवाव्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.