भंगार विक्रीतील ७०० रुपयांच्या
वाटणीवरून खून झाल्याचे उघड

भंगार विक्रीतील ७०० रुपयांच्या वाटणीवरून खून झाल्याचे उघड

Published on

पिंपरी, ता. १८ ः मोशी येथे १२ जून रोजी झालेल्या खूनप्रकरणी दोघांना अटक केली आहे. भंगार विक्रीतून मिळालेल्या ७०० रुपयांच्या वाटणीवरून चार मित्रांमध्ये वाद झाला. तिघांनी मिळून एका मित्राला दगडाने ठेचून मारल्याचे तपासात उघड झाले आहे, असे पोलिस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे यांनी सांगितले.
रवींद्र सिंह (रा. कुदळवाडी, चिखली) असे खून झालेल्याचे नाव आहे. जितेंद्रकुमार सुभाष भारद्वाज (वय २८, रा. खरदाहा नीलकंठ, ता. सलेमपूर, जि. देवरिया, उत्तरप्रदेश), रवी सुखलाल गींधे (वय २७, रा. यलदरी कॅम्प, ता. जिंतूर, जि. परभणी) यांना अटक केली आहे. त्यांचा साथीदार टिक्या (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) पळून गेला आहे. रवींद्रचा खून त्याच्या मित्रांनीच केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कुदळवाडी येथे सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाताना जितेंद्रकुमार आणि रवी यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याचेही पोलिस उपायुक्त गोरे यांनी सांगितले.
दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक शेख, अंमलदार बाळू कोकाटे, मनोजकुमार कमले, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, फारुक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडीक, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकर, प्रमोद गर्जे, अजित रूपनवर, विशाल भोईर, मारोती जायभाये, स्वप्नील महाले, तानाजी पानसरे यांच्या पथकाने दोघांना अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.