धरणातील पाणी 
गरजेनुसार वापरा

धरणातील पाणी गरजेनुसार वापरा

सोमाटणे, ता. १४ ः कासारसाई धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय न करता गरजेनुसार वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
पवनमावळ पूर्व भागातील शेतीला वरदान असलेल्या कासारसाई धरणाची पाणी पातळी वाढत्या तापमानामुळे वेगाने कमी झाली आहे. सध्या धरणात उपयुक्त पाणीसाठा ५.५७२ दशलक्ष घनमीटर असून, एकूण पाणीसाठा ६.८९१ दशलक्ष घनमीटर, ३४.६९ टक्के शिल्लक आहे. या धरणाला लाभ क्षेत्र जास्त असल्याने दिवसाला सरासरी पाऊण टक्के पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे पुढील दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय करू नये, गरजेनुसार पाण्याचा वापर करावा, असे आवाहन शाखा अभियंता अमर धायगुडे यांनी केले आहे. आढले, पुसाणे, मळवंडी धरणातील उपयुक्त पाणी पातळी शून्यापर्यंत पोचली आहे. या धरणालाही लाभ क्षेत्र असल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी झाली. पाणी समस्या टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची गरज असल्याचे मत शाखा अभियंता अमर धायगुडे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com