शाळांमध्ये सामुदायिक विश्वप्रार्थना ‘पसायदान’
पिंपरी, ता. ७ : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त राज्य सरकारने सर्व शाळांना १४ ऑगस्ट रोजी पसायदान म्हणावे, असे सूचित केले आहे. त्यानुसार शहरातील ६७२ शाळांमध्ये तयारी सुरू आहे, अशी माहिती महापालिका शिक्षण विभागाने दिली.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाच्या माध्यमातून जगाच्या कल्याणाची प्रार्थना लिहिली. आता हेच पसायदान राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाच दिवशी म्हटले जाणार आहे. तसेच, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळींवर आधारित या कवायत संचलन प्रकारांमध्ये समावेश रहावा, या उद्देशाने कार्यक्रमाची आखणी केली आहे. यासाठी समर्पक पेहराव व देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करून सादरीकरण करण्याचे आवाहन केले आहे. शाळेतील कवायत संचालन कार्यक्रम घेण्यासाठी वेगवेगळ्या वयोगटासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल. त्या कार्यक्रमांची सुमारे वीस मिनिटांची चित्रफित (व्हिडिओ) महापालिकेकडे दाखल करायची आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणे, त्यांना ज्ञानेश्वरी आणि पसायदान यांसारख्या महान कार्यांची ओळख करून देणे आणि त्यांना चांगल्या मूल्यांवर आधारित जीवन जगण्यास प्रवृत्त करणे. या प्रमुख उद्देशाने सर्व शाळांमध्ये १४ ऑगस्ट रोजी सामुदायिक पसायदान पठण केले जाणार आहे.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.