गहुंजे-पुलाचे काम पूर्ण; रस्ता अपूर्णच
सोमाटणे, ता. ७ : गहुंजे-साळुंब्रे गाव जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पण, काही जमीनदारांच्या संमतीमुळे रस्ता न झाल्याने नागरिकांचा पवना नदीतून धोकादायक प्रवास सुरूच आहे.
साळुंब्रे गहुंजे गाव जोडणाऱ्या पवना नदीवरील पूर्वीचा साकव पावसाळ्यात पाण्याखाली गेल्यावर या मार्गावरील वाहतूक बंद होत होती. या काळात नागरिकांना साळुंब्रेमार्गे गहुंजे-देहूरोडला जाताना सोमाटणेमार्गे दूरच्या अंतरावरुन वळसा घालून जावे लागत होते. यात नागरिकांचा नाहक वेळ व इंधनाचा अपव्यय होत होता. ही समस्या सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दहा कोटी ९७ लाख १६ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली. त्यानंतर खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर पद्धतीच्या या पुलाचे काम हाती घेण्यात आले. सध्या हे काम पूर्ण झाले आहे. कोल्हापूर पद्धतीच्या पुलाच्या काम पूर्ण झाल्यावर शेतीसाठी पाणी व त्यावरुनच्या दळवळणासाठी रस्ता तातडीने उपलब्ध होईल, अशी अपेक्षा नागरिकांना वाटत होती. परंतु त्यांची निराशा झाली. पुलाच्या पुढील बाजूचा रस्ता हा काही जणांच्या शेतातून जात असून त्यांची संमती न मिळाल्याने
सध्या रस्त्याचे काम रखडले आहे.
हा रस्ता न झाल्याने सध्या नागरिकांना जुन्या साळुंब्रे साकवावरुन धोकादायक प्रवास करावा लागत आहे. पावसाचा जोर वाढल्यास हा साकव केव्हाही पाण्याखाली जाऊन दळणवळण सेवा बंद पडू शकते.
PNE25V38003
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.