‘काँग्रेस सत्तेवर आल्यावर पुन्हा जेलमध्ये टाकतील’
पिंपरी, ता. १२ ः ‘काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर आम्हाला पुन्हा जेलमध्ये टाकतील,’ असे वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णी यांनी मंगळवारी (ता. १२) केले.
सकल हिंदू समाजाच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात श्रमिक गोजमगुंडे यांनी कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत घेतली. या प्रकरणात आलेले अनुभव कुलकर्णी यांनी कथन केले. न्यायालयाने नुकताच निकाल दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम झाला.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एफआयआर कुणी गायब केला, असा सवाल करून कुलकर्णी म्हणाले, ‘‘तत्कालीन काँग्रेस सरकारने आम्हाला या प्रकरणात गोवले. २०१४ मध्ये सरकार बदलल्यानंतर सरकारी वकील बदलले. आमच्या बाजूने ठोस पुरावे सादर झाले. नवे सरकार निवडून आले म्हणूनच आम्ही जिवंत बाहेर आलो.’’
कुलकर्णी यांनी या मुलाखतीत ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, दिवंगत आर. आर. पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर आरोप केले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मोरया गोसावी ट्रस्ट जितेंद्र देव महाराज, माणिक महाराज मोरे उपस्थित होते.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.