पिंपरी सकाळ वृक्षारोपण
वृक्षारोपण मोहिमेत कुटुंबासह सज्ज व्हा !
‘सकाळ’ आणि यशदा रिॲलिटी यांच्यातर्फे २४ ऑगस्ट रोजी विधायक उपक्रम
पिंपरी, ता. १४ ः सण, समारंभ वा विशेष दिन आला की अनेकजण वृक्षारोपण करतात आणि विसरून जातात. त्या वृक्षांकडे, त्यांच्या संरक्षण व संवर्धनाकडे दुर्लक्ष होते. परिणामी वृक्षारोपणाचा उद्देश सफल होत नाही. मात्र, ‘सकाळ’ आणि यशदा रिॲलिटी यांच्यातर्फे रविवारी (ता. २४ ऑगस्ट) आयोजित वृक्षारोपण मोहिमेत केवळ वृक्ष लागवड केली जाणार नसून, त्यांची पुढील तीन वर्ष निगा राखली जाणार आहे. तेही वृक्षारोपण करणाऱ्या कुटुंबाच्या नावाने, तेव्हा सज्ज व्हा ! आणि वृक्षारोपणाच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी आपला रविवार आजच राखून ठेवा.
यशदा रिॲलिटी’ हे बांधकाम क्षेत्रातील नामांकित नाव आहे. ग्राहकांना परवडतील असे गृहप्रकल्प उभारून त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करून द्यायचे, हा त्यांचा प्रमुख उद्देश असला तरी, निसर्गाचे व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेतून ‘वृक्षारोपण आणि संवर्धनाचा’ वसा त्यांनी घेतला आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ची साथ त्यांना लाभली आहे. ‘एक सदनिका, एक झाड’ अर्थात ‘एक कुटुंब, एक झाड’ अशी ही संकल्पना घेऊन वृक्षारोपण केले जाणार आहे.
तीन वर्ष राखणार निगा
केवळ वृक्षारोपण करायचे नसून, पुढील तीन वर्ष त्याचे संगोपन व संवर्धनही केले जाणार आहे. त्यासाठी नैसर्गिक खत, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जनावरांपासून संरक्षणासाठी प्रत्येक रोपाची निगा राखली जाणार आहे. ‘यशदा रिॲलटी’च्या ग्राहकांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले जाणार आहे. सुमारे दोन हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. शिवाय, यापूर्वी विक्री केलेल्या सदनिकाधारकांच्या हस्तेही वृक्षारोपण केले जाणार आहे.
संतांच्या साक्षीने उपक्रम
पर्यावरण संवर्धन आणि वृक्षांचे महत्त्व संतांनी अधोरेखित केले आहे. शिवाय, यावर्षी संत ज्ञानेश्वर माउली यांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘यशदा रिॲलिटी यांच्यातर्फे वृक्षारोपण उपक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत अनेक नागरिक कुटुंबासह या उपक्रमात सहभागी होत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क ः अक्षय - ९५६१३१४६७९
नागरिक म्हणतात...
रोहित शिंदे (यशदा सुप्रिम) ः मैत्री किंवा ‘माय ट्री’ हा ‘सकाळ’ आणि यशदा रिॲलिटी यांचा खूपच स्तुत्य आणि आश्वासक उपक्रम आहे. लावलेले प्रत्येक झाड स्वच्छ हवा, समृद्ध जैवविविधता आणि निरोगी पृथ्वीचे वचन देते. ही वृक्षारोपण मोहीम एक प्रकर्षाने आठवण करून देईल की लहान कृतींमुळे दीर्घकाळ बदल घडू शकतो.
ःऋचा मगदूम (यशदा विंडसॉंग) ः यशदा रिॲलिटी तर्फे आयोजित वृक्षारोपण उपक्रमामुळे पर्यावरण आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि सजगता यांचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण झाले आहे. या उपक्रमातून निसर्गावरील प्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श उभा केला आहे. यशदा रिअॅल्टीचे अभिनंदन आणि पुढील उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा!
अमर देशमुख (यशदा इपिक) ः यशदा रिॲलिटी ग्रुपच्या वृक्षारोपण मोहिमेचा भाग झाल्याचा मला अभिमान आहे. हे हरित उद्यानाकडे टाकलेले एक पाऊल आहे. चला, चांगल्या भविष्यासाठी आजच शाश्वततेची मुळे वाढवूया!
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.