भाताचे पीक जोमात; उत्पादन वाढीचा अंदाज
सोमाटणे, ता. १८ : ऑगस्टमध्ये भाताला आवश्यकतेनुसार पाऊस झाल्याने पीक जोमात आले असून, उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
यंदा भात लावणीस उशीर झाला होता. त्यानंतर सतत पडणाऱ्या पावसामुळे भाताचे पीक पिवळे पडून त्याची वाढ मंदावली होती. परिणामी, रोगराईचा धोका वाढल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, ऑगस्टच्या सुरुवातीपासून ऊन-पावसाचा समतोल निर्माण झाल्याने भाताची वाढ वेगाने सुरू झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या हवामानामुळे भातावरील रोगाचा धोका टळला आहे. सध्या भात पीक चांगल्या स्थितीत असून, जून महिन्याच्या सुरुवातीस लावणी केलेल्या भाताची निसवणी पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. रोगाचा धोका कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे.
‘‘गेल्या दोन आठवड्यापासून भातास आवश्यक असणारा पाऊस व तापमान मिळाल्याने भात पीक चांगले आले असून, उत्पादनात वाढ होणार आहे.
- नवीनचंद्र बोऱ्हाडे, कृषी सहाय्यक अधिकारी, पवनमावळ
PNE25V40528
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.