पवन मावळातील शेतकऱ्यांचा कल फळबागांकडे

पवन मावळातील शेतकऱ्यांचा कल फळबागांकडे

Published on

सोमाटणे, ता. २५ : ऊस, भात पिकांना पर्याय म्हणून पवन मावळातील शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवडीकडे वळला आहे. चांदखेड पाचाणे येथे झाली. येथील शेतकरी नितीन गायकवाड यांच्या पुढाकाराने फळबागेची बचतगट शेती सुरू करण्यात आली आहे.
गेल्या अनेक पिढ्यांपासून आंबेमोहर, इंद्रायणी भाताचे आगर असलेल्या पवनमावळातील शेतकऱ्यांनी भाताचे क्षेत्र कमी केले. कमी श्रमात अधिक उत्पादन म्हणून येथील शेतकरी ऊस लागवडीकडे वळले होते. गेली दोन दशके शेतकरी ऊस उत्पादन घेत होते. परंतु, त्यापेक्षा कमी श्रमात अधिक उत्पादन फळझाडांपासून मिळू लागल्याचे नितीन गायकवाड यांच्या पेरू बागेतून निदर्शनास आले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा कल फळबागांकडे वाढला आहे.
यातूनच चांदखेड येथील कृषीनिष्ठ बळीराजा शेतकरी बचत गटाच्या वतीने मावळ कृषी विभागाच्या सहकार्याने नुकतीच आंबा, नारळ या फळझाडांची लागवड केली. तत्पूर्वी शेतकरी बचत गटाच्या वतीने विविध कृषी विद्यापीठांना भेटी देऊन पाहणी केली होती. यानंतर मावळातील हवामानात कोणती फळझाडे चांगली वाढू शकतील, याचा सर्व्हे करून त्यांनी आंबा, नारळाची निवड केली. इतर शेतकऱ्यांनीही या उपक्रमाचे अनुकरण करावे, असे आवाहन बाळीराजा शेतकरी गटाने व्यक्त केली आहे. पाचाणे येथील शेतकऱ्यांनीही या उपक्रमाचे अनुकरण सुरू केले असून पुढील आठवड्यात त्यांचीही फळपीक लागवड सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com