धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच

धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच

Published on

सोमाटणे, ता. ५ ः पवनमावळातील पाचही धरणांत दहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. आढले, पुसाणे, मळवंडी आणि कासारसाई धरणांमधून पाण्याचा विसर्ग अद्याप सुरूच आहे.
यंदा १५ मेपासून पावसाला सुरुवात झाली. त्याने पवन मावळातील आढले, पुसाणे, मळवंडी ही तीनही धरणे मे महिन्यातच तुडूंब भरुन त्यांच्या सांडव्यातून पाणी सोडण्यात आले होते. ते अद्याप सुरूच आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात या तीनही धरणात केवळ शून्य टक्के उपयुक्त पाणी साठा होता. या पावसाने यंदा प्रथमच कासारसाई धरण वीस जूनलाच भरल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातून वीस जूनलाच विसर्ग सुरू करण्यात आला होता. तो देखील अद्याप सुरूच आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत आढले, पुसाणे, मळवंडी धरणात शंभर टक्के जादा पाणीसाठा झाला असून कासारसाई धरणात पंचावन्न टक्के जादा पाणी साठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com