मावळातील नद्यांची पूरस्थिती अद्याप कायम
सोमाटणे, ता. ८ ः मावळात पावसाचा जोर कमी झाला तरीही पवना, कासारसाई, आढले नद्यांची पूरस्थिती कायम असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले.
मागील महिन्यात पंधरा मेपासून मावळात पडत असलेल्या पावसाने मावळातील काही धरणे भरली. त्यापैकी आढले, पुसाणे, मळवंडी धरणाच्या सांडव्यांतून पाणी वाहत होते. तर कासारसाई पवना धरणातही आवश्यकतेप्रमाणे पुरेसा पाणी साठा झाल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. या विसर्गामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून आढले, कासारसाई, पवना या तीनही नद्यांना पूर आल्याने या नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत होत्या. मंगळवारी पहाटेपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला, तरीही डोंगरदऱ्यांतून वाहणाऱ्या पाण्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे नद्यांची पूरस्थिती अद्याप कायम आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवला जाणार असल्याने नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये, नदी किनारी असलेले जनावरे दूर न्यावीत, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी दूर राहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये, वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे, त्यांचे पालन करावे, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाच्यावतीने कार्यकारी अभियंता डी.एम.डुबल यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.