
पिंपरी, ता. ८ ः ‘‘राजीव गांधी आयटी पार्क व परिसरात असणारा पायाभूत सुविधांचा अभाव, येथे होणारी वाहतूक कोंडी, विस्कळीत वीजपुरवठा यातून मार्ग काढण्यासाठी हिंजवडीसह जांभे, गहुंजे, नांदे, लवळे, पिरंगुट, भुकूम या भागांसाठी स्वतंत्र प्रशासकीय संस्था स्थापन करावी. जोपर्यंत हा निर्णय होत नाही; तो पर्यंत येथे नोडल अधिकारी नेमावा.’’, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
गेल्या महिनाभरापासून हिंजवडी आयटी पार्कमधील खराब रस्ते व होणारी वाहतूक कोंडी यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. हिंजवडी भागामध्ये पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका, हिंजवडी व माण ग्रामपंचायत असे विविध प्रशासकीय विभाग कार्यरत असल्याने या सर्वांमध्ये समन्वय नसल्याचे वारंवार अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर या भागासाठी स्वतंत्र प्रशासकीय संस्था स्थापन करावी अशी मागणी खासदार सुळे यांनी यापूर्वीही केली होती. मात्र, याबाबतचा निर्णय होईपर्यंत येथील प्रशासकीय विभागांमध्ये समन्वय राहावा, यासाठी नोडल अधिकारी नेमण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हिंजवडी, माण-मारुंजी या भागातील राजीव गांधी इन्फोटेक पार्क या भागासह आणि लगतच्या भागांसाठी एक स्वतंत्र प्रशासकीय संस्था स्थापन करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत निर्णय होईपर्यंत शासकीय आस्थापनांशी समन्वय साधण्यासाठी एक सक्षम नोडल अधिकारी नेमण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिक आपल्या अडीअडचणींबाबत पाठपुरावा करु शकतील व त्यांना होणारा त्रास थांबेल. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनी याचा गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्यावा.
- सुप्रिया सुळे, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.