जनसुरक्षा विधेयक
हाणून पाडा ः काळे

जनसुरक्षा विधेयक हाणून पाडा ः काळे

Published on

पिंपरी, ता. १२ : महाराष्ट्र सरकार जनसुरक्षा विधेयकाच्या आडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार हिरावून घेत आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केला. हा कायदा हाणून पाडण्याचे आवाहनही त्यांनी केले. याविषयी त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘सरकार आणत असलेला हा कायदा विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात आहे. नक्षलवादी संघटनांना पायबंद घालण्याच्या नावाखाली हा कायदा आणला जात आहे. तसे दाखवले जात असले तरी सरकारी धोरणांविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्यासाठीच हा कायदा आहे. हा कायदा लागू झाला तर सरकारला अमर्याद अधिकार प्राप्त होतील. त्या माध्यमातून कोणत्याही सामाजिक संघटनेला किंवा त्या संघटनेच्या कार्यकर्त्याला केव्हाही अटक करण्याचे अधिकार सरकारला प्राप्त होणार आहेत. त्‍यामुळे हुकूमशाही वाढेल.’
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com