श्रावणी काव्य स्पर्धेसाठी ३१ जुलै अंतिम तारीख
पिंपरी, ता. १५ ः नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाणाऱ्या श्रावणी काव्य स्पर्धेसाठी ३१ जुलैपर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे ३२ वे वर्ष असून, या स्पर्धेसाठी कोणत्याही विषयाचे बंधन नसणार आहे. या स्पर्धेत या कवितेचे स्पर्धा प्रत्यक्ष सादरीकरण करणेही आवश्यक असणारे आहे. ही काव्यस्पर्धा २१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी तीन वाजता पिंपरी-चिंचवड परिसरात आयोजित केली असल्याची माहिती नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी दिली. तसेच ठरलेल्या कालावधीनंतर पाठविलेल्या तसेच नियमात न बसणाऱ्या कविता स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
स्पर्धेचे नियम
- आपली एक कविता ९८२२८८४९९२ या व्हॉटसअप नंबरवर टाइप करून पाठवावी
- कविता किमान १२ ते २० ओळी पर्यंत असावी. यापेक्षा दीर्घ असू नये
- सुरुवातीला नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित श्रावणी काव्य स्पर्धा ३२ साठी असा उल्लेख करावा.
- कवितेचे शीर्षक, कविता, त्याखाली संपूर्ण नाव,आपला परिसर आणि संपर्क क्रमांक टाकावा
- कवितेमधून राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी
- संबंधित कवीने आपली कविता स्पर्धेच्या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी येऊन स्वतः सादर करायची आहे
- सादरीकरणाचे गुण गृहीत धरले जातील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.