‘अन्न सुरक्षा’ योजनेसाठी दरमहा २०० अर्ज
पिंपरी, ता. १५ : अन्नसुरक्षा योजनेतून मोफत धान्य मिळवण्यासाठी चिंचवड येथील शिधापत्रिका कार्यालयात रोज सात ते आठ अर्ज येत आहेत. ही संख्या दरमहा सरासरी २०० पर्यंत जात आहे. अन्नसुरक्षेच्या कक्षेत येणाऱ्या गरजू व पात्र कुटुंबांना योजना मंजूर करून मोफत धान्य पुरवले जात आहे. आतापर्यंत ७०० नवीन शिधापत्रिकाधारक कुटुंबांना योजनेत समाविष्ट करून मोफत धान्य देणे सुरू झाले आहे.
अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दरमहा एका कुटुंबाला प्रत्येकी दोन किलो गहू, तीन किलो तांदूळ आणि एकूण पाच किलोपर्यंत धान्य मोफत पुरवले जाते. एक लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या (केशरी शिधापत्रिकाधारक) कुटुंबांना सध्या अन्नसुरक्षेच्या यादीत समाविष्ट केले जात नाही. मात्र, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयांपर्यंत आहे, अशा गरजू कुटुंबांना ही योजना लागू होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गरजूंचे हमीपत्र
आलेल्या अर्जांची काटेकोर तपासणी करून कार्यालयाकडून निर्णय घेतला जातो. गरजू कुटुंब असेल, तर हमीपत्र घेतले जाते. तहसील कार्यालयाच्या उत्पन्नाच्या दाखल्याची मागणी करत नाही. मात्र, इतर माध्यमांतून शहानिशा केली जाते. गरज पाहून धान्य सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिधापत्रिकाधारकांची स्थिती
धान्य मिळणारी एकूण कुटुंबसंख्या : ४१ हजार
धान्य घेणारी लाभार्थी संख्या : एक लाख ७० हजार २००
धान्यासाठी नव्याने समाविष्ट केलेली कुटुंब संख्या : ७००
सद्यस्थितीत चिंचवड शिधापत्रिका कार्यालय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोचविण्यासाठी पुढाकार घेत आहे. अनेक कुटुंबे या योजनेत समाविष्ट होण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. नियमांचे काटेकोर पालन करत त्यांना धान्य मिळावे, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत.
- विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, चिंचवड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.