वाल्हेकरवाडीतील ओढ्याचे काम संथगतीने

वाल्हेकरवाडीतील ओढ्याचे काम संथगतीने

Published on

पिंपरी, ता. २८ : शहरातील वाल्हेकरवाडी येथील राजयोग कॉलनी परिसरातील ओढ्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. गेले दोन महिने या भागातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी या भागातून रावेतकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा वळसा पडत असून, यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि छोटे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.

रस्ता बंद, लांबचा वळसा
- रेणुका वृंदावन सोसायटी शेजारील ओढ्यावर सध्या भिंतीची डागडुजी व वाहिनी टाकण्याचे काम सुरू
- कामासाठी संपूर्ण मार्ग बंद करण्यात आला
- रस्ता बंद असल्याने नागरिकांना रावेत, आकुर्डी रेल्वे स्टेशन, मुकाई चौक, चिंचवड आदी भागात जाण्यासाठी दीर्घ वळसा

विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय
- आकुर्डी, रावेत परिसरात अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाची महाविद्यालये असून, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ
- विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळेत पोहोचण्यात अडचणी
- छोट्या व्यवसायांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही नाहक वेळ व इंधन खर्चाचा करावा लागतोय सामना
- स्थानिक रहिवाशांनाही दैनंदिन गरजांसाठीचा प्रवास त्रासदायक

कामाचा संथ वेग आणि निष्काळजीपणा
- दोन महिन्यांपूर्वी ओढ्याच्या भिंतीचे काम आणि वाहिनी टाकण्याची प्रक्रिया सुरू
- अद्याप हे काम पूर्णत्वास गेलेले नाही
- कामाच्या संथगतीमुळे नागरिकांत नाराजी

काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी
- या भागातील वाढती लोकसंख्या, विद्यार्थ्यांची गर्दी, तसेच व्यवसायिकांची हालचाल लक्षात घेता हा रस्ता अतिशय महत्त्वाचा
- स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी
- रस्ता पूर्ण बंद न करता काही पर्यायी मार्ग अथवा काही वेळेसाठी एकेरी वाहतूक खुली ठेवावी
---
प्रशासनाचे दुर्लक्ष?
- याआधी देखील शहरातील विविध भागांमध्ये रस्ते कामे चालू असताना वाहनचालकांना पर्याय न देता रस्ते बंद
- महापालिकेच्या कामकाजावर वारंवार प्रश्नचिन्ह
- नियोजनाचा अभाव आणि कंत्राटदारांकडून होणाऱ्या कामातील दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त

सूचना फलक नाही
- संबंधित रस्ता वाहतुकीसाठी बंद असताना या मार्गाकडे जाताना कुठलाही सूचना फलक नाही
- वाहनचालक अडकतात आणि गोंधळ निर्माण होतो
- लांबचा फेरा मारून परत माघारी यावे लागते

वाल्हेकरवाडी परिसरातील ओढ्याचे काम लवकर पूर्ण न झाल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. महापालिकेने तत्काळ लक्ष घालून काम जलदगतीने पूर्ण करावे, पर्यायी मार्गांची सुविधा द्यावी, तसेच रस्त्यावर सुरक्षितता व माहिती फलक लावून नागरिकांच्या हालअपेष्टा कमी कराव्यात.
- सुहास खंडारे, वाल्हेकरवाडी

या ठिकाणी एमएसइबीच्या केबल असल्याने त्या बंद करून काम करावे लागत आहे. यानंतर सांडपाणी वाहिनीचे काम पूर्ण होऊन साधारणतः: आणखी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
- चंद्रकांत मुठाळ, कार्यकारी अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com