

जाहिरातींसाठी झाडांची हानी थांबवा
काही जण जाहिरातीसाठी झाडांना खिळे ठोकून त्यावर कागद किंवा फलक लावतात. मात्र झाडे ही सजीव असून ती आपल्याला सावली, फळे तसेच प्राणवायू (ऑक्सिजन) देतात. अशा प्रकारे झाडांना खिळे ठोकल्यामुळे त्यांना इजा होते व त्यांच्या वाढीवर आणि जगण्यावरही परिणाम होतो. झाडांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समाजात याबाबत जनजागृती व्हावी.
- सां. रा. वाठारकर.चिंचवड