पवना धरण ७२ टक्के भरले मावळसह पिंपरी चिंचवड शहराची पाण्याची चिंता मिटली
पवनानगर, ता. ५ ः मावळसह पिंपरी चिंचवड शहराला पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असलेले पवना धरण ७२ टक्के भरले असून, पाण्याची चिंता मिटली आहे. या वर्षी धरण पाणलोट क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा विचार करून पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून सांडव्यातून ४०० क्युसेकने पाणी पवना नदी पात्रात सोडण्यात येत आहे. गेल्या २४ तासात ३३ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे तर १ जूनपासून १०८५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून, धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे.
आज सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने मुक्त विसर्ग करण्यात येणार आहे. प्रथम सांडव्यावरील विसर्ग ४०० क्यूसेस इतका राहणार असून, हा विसर्ग ता. १५ जुलैपर्यंत चालू राहणार आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग कमी/जास्त होण्याची शक्यता आहे.
पवना पाटबंधारे विभागाचे अभियंता सचिन गाडे म्हणाले,
‘‘पवना धरण ७२ टक्के भरले असून, वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. धरणातून सांडव्याद्वारे ४०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू राहील. मात्र, पाणी जपून वापरावे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.’’
फोटोः 02230
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.