इंद्रायणी तांदळाच्या बियाणांचा तुटवडा
तळेगाव दाभाडे, ता. ३ : ‘‘मावळ तालुक्यातील प्रसिद्ध अशा इंद्रायणी तांदळाच्या लागवडीसाठी उच्च प्रतीच्या बियाणांचा तुटवडा दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यावर सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात,’’ अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत बुधवारी (ता.२) मांडली.
‘‘मावळ तालुक्यात सुमारे १२ हजार ८६५ हेक्टरवर इंद्रायणी तांदळाची लागवड होते. परंतु, यावर्षी गुणवत्तापूर्ण बियाणांचा तुटवडा जाणवतो आहे. कृषी विद्यापीठाकडे वारंवार मागणी करूनही योग्य कार्यवाही होत नाही,’’ असा आरोप करत शेळके यांनी शासनाच्या नियोजनावर टीका केली.
‘‘राज्याबाहेर बियाणांची विक्री करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. हे थांबवायला हवे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात बियाणे मिळणे हा त्यांचा हक्क आहे,’’ असे शेळके म्हणाले.
शेळके यांनी मांडलेल्या मागण्या...
बियाणांच्या काळ्या बाजारावर आळा घालण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, स्थानिक कृषी संस्था व सहकारी संघटनांना थेट बियाणे पुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अशा मागण्या शेळके यांनी मांडल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.