सांडपाण्याला कंटाळून ग्रामसभेत आत्मदहनाचा प्रयत्न
तळेगाव दाभाडे, ता. ८ : ‘‘मागील चार वर्षांपासून सांडपाण्याच्या समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे. याला कामशेत ग्रुप ग्रामपंचायत जबाबदार आहे,’’ असा आरोप करत रामचंद्र धावडे यांनी ग्रामसभेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखविल्याने अनर्थ टळला.
याबाबत धावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘त्यांच्या शेतात गेल्या चार वर्षांपासून सांडपाणी जमा होत आहे. हा त्रास घरापर्यंत पोहोचला आहे. पावसाळ्यात घरात पाणी शिरून सरपटणारे प्राणी येत आहेत. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. अखेर सततच्या दुर्लक्षाला कंटाळून ग्रामसभेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.’’
या घटनेनंतर पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात बैठक घेतली. सरपंच रुपेश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी धनंजय देशमुख, कृषी अधिकारी व शेतकरी यांची बैठक घेतली. बैठकीनंतर ग्रामपंचायतीने तत्काळ जेसीबी लाऊन काम सुरू केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.