सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Published on

वडगाव मावळ, ता. १८ : ‘‘मावळ तालुक्यात मे च्या दुसऱ्या आठवड्यापासून सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भात बियाण्यांची (दाढ) पेरणी करता आली नाही. त्यामुळे मावळ तालुका टंचाईग्रस्त जाहीर करावा,’’ अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक माउली दाभाडे यांनी केली आहे.
दाभाडे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, ‘‘मावळ तालुक्यामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आज अखेर सातत्याने पाऊस पडत आहे. पावसामुळे जमिनीत वापसा होऊ शकला नाही. त्यामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना भाताच्या बियाण्यांची पेरणी करता आली नाही. तालुक्यात भात लागवडीवर सुमारे ८० टक्के परिणाम झाला आहे. महसुली यंत्रणा व कृषी विभागामार्फत पाहणी करून याबाबतचा अहवाल तयार करावा. शासनाला सादर करून तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com