शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने द्या

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने द्या

Published on

वडगाव मावळ, ता. ३१ : ‘‘मावळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी,’’ अशी मागणी आंदर मावळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मावळ तालुका राष्ट्रवादीचे संघटनमंत्री नारायण ठाकर यांच्यासह शांताराम लष्करी, शिवाजी करवंदे, सरपंच भिकाजी भागवत, मारुती असवले, किसन गवारी, भास्कर पिचड, नथू गवारी, बुधाजी पिचड, सदाशिव निसाळ, मारुती खामकर, बळीराम भोईरकर यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले.
‘‘भात पेरणीवेळी मे मध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे पेरणी पुरेशा प्रमाणात झालेली नाही. त्यामुळे भातलागवड कमी झाली. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी एकमेकांकडून भातरोपे गोळा करून काही प्रमाणात भात लागवड केली. आता भात कापणीला आले असताना अवकाळी पावसामुळे भातपिके जमीनदोस्त झाली आहेत. खाचरात काढून ठेवलेले भात पाण्यात भिजले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलेला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा व घेतलेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न त्याला पडला आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी,’’ अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com