
पिंपरी : गेल्या दहा वर्षांमध्ये कात्रज-पुणे बाह्यवळण मार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उपनगरांचे शहरीकरण झाले. मात्र, हा मार्ग ओलांडण्यासाठी आवश्यक असलेल्या येथील ताथवडे-पुनावळे भुयारी मार्गांचा विस्तार मागणी होऊनही झालेला नाही. परिणामी, येथील रहिवाशांना किंवा या भागातून प्रवास करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांना गेल्या काही वर्षांपासून प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.