
पिंपरी : रेशनविक्रीसाठी सरकारने दिलेल्या ई-पॉस मशिनवरील धान्याच्या प्रकाराच्या विसंगत प्राधान्यक्रमामुळे धान्यवाटपास उशिर होतो. त्यामुळे हा प्राधान्यक्रम सुसंगत करावा, अशी शहरातील काही रेशन दुकानदारांची मागणी आहे.
पूर्वी रेशनवर पात्र लाभार्थ्यांना सर्व वस्तू मिळत होत्या. अशा लाभार्थ्यांची संख्याही जास्त होती. मात्र गेल्या काही वर्षांत नागरिकांचा आर्थिक स्तर वाढल्याने आणि सरकारी नियमात काही बदल झाल्याने सर्व वस्तू मिळणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र, त्यासाठीचा ई-पॉस मशिनवरील प्राधान्यक्रम जुनाच आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांना या मशिनवर प्रत्येक प्रकार सिलेक्ट करताना मशिनचे लहान बटणसारखे खाली-वर करावे लागते. त्यात बराच कालापव्यय होतो.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
परिणामी दुकानासमोर लागलेली रांग वाढत जाते. शहरात स्वस्त धान्य विक्री करणारी 200 दुकाने आहेत. येथे लाभार्थ्यांपैकी बहुतेकांना गहू, तांदूळ, तूरडाळ आणि हरभरा डाळ या चार वस्तूच मिळतात. या वस्तू मशिनवर प्रथम घेतल्यास दुकानदार ग्राहकांना जलदगतीने वस्तूंचे वाटप करू शकतील. दारिद्रयरेषेखाली असणाऱ्या साखर, रॉकेल मिळू शकणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण जेमतेम 10 ते 20 टक्के आहे. मशिनवर गहू, तांदूळ, साखर अशा विविध दहा वस्तूंची नोंद आहे. अन्य सहा वस्तूंचा प्राधान्यक्रम नंतर ठेवावा, अशी त्यांची मागणी आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.