
स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका 'लक्ष्मीच्या पावलांनी' सध्या टीआरपी यादीत टॉप १० मध्ये आहे. मालिकेची कथा आणि मालिकेतील कलाकारदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. कला आणि अद्वैत यांच्यातील भांडणं आणि फुलणारं प्रेम हे दोन्ही प्रेक्षकांना आवडतंय. मात्र अशातच नुकतीच एका अभिनेत्याने या मालिकेतून एक्झिट घेतली होती. आता त्यावर अभिनेत्याने मौन सोडलं आहे. त्याने स्वतः एक व्हिडिओ शेअर करत ही मालिका सोडण्याचं कारण सांगितलंय.