

अभिनेता अल्लू अर्जुन याच्यासोबत आज धक्कादायक घटना घडली. 'पुष्पा २' च्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी कारवाई करत अल्लू अर्जुनला अटक केली. आज १३ डिसेंबर रोजी नाट्यमय पद्धतीने अभिनेत्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला तेलंगणा कोर्टात नेण्यातवाल. तिथे झालेल्या सुनावणीत अभिनेत्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. तक्रार केलेल्या व्यक्तीने आपण ही तक्रार मागे घेणार असल्याचं सांगितलं आहे.