
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, परंतु ही स्थापना झाली त्या चळवळीच्या पूर्ण उद्दिष्टांची पूर्तता झाली नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली, पण सीमाभाग — विशेषतः बेळगाव, कारवार, निपाणी हे भाग — महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकले नाहीत. ही खंत केवळ राजकीय नेतृत्वातच नव्हती, तर ती लोककवी अण्णाभाऊ साठे यांच्या संवेदनशील मनातही खोलवर घर करून होती. त्यांनी ही वेदना आपल्या साहित्य, छकडी आणि लोककलेच्या माध्यमातून मांडली, आणि त्यामुळेच ते फक्त लेखक नव्हते, तर एक सांस्कृतिक योद्धा होते.