

bharat bhagya vidhata review
esakal
मुंबईवर झालेला २६/११ चा अतिरेकी हल्ला हा भारताच्या इतिहासातील एक डाग आहे. आतापर्यंत या अतिरेकी हल्ल्यावर अनेक चित्रपट आणि वेबसीरिज आल्या आहेत. मात्र त्यामध्ये प्रामुख्याने पोलिस दल, सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवादविरोधी कारवायांवर अधिक भर देण्यात आला. परंतु त्या भीषण रात्री कामा रुग्णालयात अतिरेकी हल्ला झाल्यानंतर नेमके काय घडले? तेथील परिचारिका, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची मानसिक अवस्था कशी होती? साक्षात मृत्यू समोर असताना त्यांनी रुग्णांचे जीव कसे वाचविले...याची थरारक कथा म्हणजे भारत भाग्य विधाता चित्रपट.